book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे
₹30.00
सद्गुरू वामनराव पै यांनी हे पुस्तक खास विद्यार्थ्यांसाठी लिहीलेले आहे. आजचे विद्यार्थी हे राष्ट्राचे उद्याचे नागरिक असून त्यांच्यावरच आपल्या राष्ट्राचे भवितव्य पूर्णत: अवलंबून आहे. सूक्ष्म निरिक्षण केले असता असे दिसून येते की, आजचे विद्यार्थी खूपच हुशार आहेत. अशा हुशार विद्यार्थ्यांना वेळीच जर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते वाया जातील व परिणामी राष्ट्राचे हितच धोक्यात येईल. आजच्या शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वर म्हटल्याप्रमाणे वेळीच मार्गदर्शन मिळावे व ते राष्ट्राचे उत्तम नागरिक बनून त्यांनी आपल्या राष्ट्राला सर्वाथाने प्रगतीपथावर न्यावे यासाठी प्रस्तुत पुस्तक प्रकाशित करीत आहोत. विद्यार्थ्यांनी सदगुरुंना निरनिराळ्या प्रसंगी विचारलेले विविध प्रश्न लक्षात घेऊन प्रस्तुत प्रश्नोत्तराचे पुस्तक लिहीलेले आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अभ्यासपूर्वक पुन्हा पुन्हा वाचावे, त्यातील बोध आत्मसात करावा व स्वत:चे, समाजचे व राष्ट्राचे कल्याण साधावे.
In stock
Reviews
There are no reviews yet.